Friday, February 24, 2017


संस्कारांना परिस्तिथीचा अपवाद नसावा हे माझे प्रांजळ मत आहे .
सोयीस्कररित्या वागणे ,बोलणे , विचार आणि आचार बदलणे हे तत्व नसलेल्या हरलेल्या आणि ढोंगी माणसाचे लक्षण आहे असे मला वाटते .
परिस्तिथीचा टेकू घेऊन खोटे वागणे, गरजेनुसार लोकांना वापरून घेणे ,हवी तेव्हा तत्वांशी तडजोड करून युती करणे हे म्हणजे धाधान्त खोटे आणि अप्पलपोटी माणसाचे लक्षण आहे .
आपल्या वागण्याला परिस्तिथीचे कारण देणे आणि त्याचे उदात्तीकरण करून संस्कार सोडणे हे सुसंस्कृत माणसाचे लक्षण नक्कीच नाही .
परिस्तिथी बरी-वाईट हा तर नियतीचा खेळ आहे, किन्तु त्यामध्ये स्वतःच्या विवेकबुद्धी ला हरवून दुतोंडी वागणे हे मनुष्याचे नाही तर पशूचे लक्षण आहे .
खरा मनुष्य कोणत्याही परिस्तिथी मध्ये आपल्या तत्वांना , संस्कारांना किंवा विचारांना मुरड घालत नाही , त्यामुळे परिस्थिती नव्हे तर मनुष्याचा दुबळेपणा त्याला असंस्कृत बनवतो.
आपला प्रदेश, आजूबाजूची परिस्थिती किंवा आपला काळ ह्याने आपले वागणे नाही ठरवावे तर ते आपल्या मूलभूत संसकाराने आणि विवेक बुद्धी ने ठरवावे .
कर्माचा खेळ खूप निराळा आहे जे पेरतो ते नक्की कधीतरी परत येते , त्यामुळे आपल्या चुकीच्या आणि खोट्या वागण्याला परिस्तिथी, नशीब असल्या दुबळ्या शब्दांचा आधार देण्यापेक्षा संस्कार आणि तत्वांचा आधार देऊन सक्षम आणि सुसंस्कृत समाज तयार करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे .

शुभम भवतु

अद्वैत