Monday, March 21, 2016


साथ





आज असेच श्री प्रकाशराव बाबा आमटे विषयी वाचत होतो , सर्वांच्या हृदयावर आदर्श छाप पाडणारे अवलिया व्यक्तिमत्व. 
असेच माझ्या विनोद बुद्धीला काही प्रश्न पडले , कि मंदाताई नी समजा प्रकाशरावंना असे सर्वसाधारण प्रश्न विचारले असते , तुम्हाला काय करायचे आहे ?
कशाला लष्कराच्या भाकऱ्या  थापता ? त्या लोकांना कळणार तरी आहे का तुम्ही काय म्हणता त्यांची तेव्हडी समज तरी आहे का ? त्यांना तुमची गरज हि नाही ? तुम्हाला ते तुमच्या मागे नावं ठेवतील ? कशाला उगाच तुमची वर्षे फुकट घालवता ? चांगली प्रक्टिस करा घरा कडे लक्ष द्या , सुखाने बायका मुलां कडे लक्ष द्या ? समाजाला सुधारण्याचा ठेका काय फक्त तुम्हीच घेतला आहात का ? असे कित्येक , म्हणा  विनोदाचा भाग निराळा.
पण खरेच मंदाताई च्या खंबीर आणि साकारात्काम साथी शिवाय प्रकाशराव इतका मोठा शिवधनुष्य पेलू शकले नसते कदाचित. त्यांना प्रत्येक अडचणी मध्ये मागे खेचण्या पेक्षा पुढे जाण्यासाठी बळ दिले साथ दिली आणि काठावर उभे राहून चुका काढून खच्चिकरण करण्यापेक्षा त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन त्या युधाभूमिमध्ये धैर्याने उभ्या राहिल्या , खरच अश्या माउलीला शतशः प्रणाम , हेच खरे स्त्री सशक्तीकरण आहे , आता प्रत्येकाला प्रकाशराव होता येते असे नाही आणि त्यांना तशी मंदाताई सारखी साथ मिळेल असे हि नाही , ज्याचा त्याच्या नशिबाचा भाग.


हा विषय आज बोलण्याचं प्रयोजन इतकेच , त्या दोघांनी एकमेकांच्या साथी ने एका वेगळ्या समाजाचा पायैन्डा घातला , आपण हि असेच एकमेकांना साथ देऊन नवीन काही नक्कीच करू शकु. आज आपल्या समाजात जी काही अराजकता माजली आहे , राजकारणी , बुद्धीजीवी आपापल्या पद्धतीने सामाजिक परिस्तिथी चे वाभाडे काढत आहेत. झेंड्याचे , जातीचे भेद आणून समाजाला तोडण्याचा प्रयन्त चालू आहे. 
आज सगळे जण प्रदेश वेगळा हवा , आरक्षण हवे ह्यासाठी भांडत आहेत , प्रगती साठी किंवा  एकी साठी कोणीच पुढे येत नाही आहेत …
लिंग,जात,धर्म,हिरवा/भगवा/निळा,श्रीमंत गरीब  असा भेद न करता मानवता हा एकाच धर्म आणि तीच एक जात असे बाळगून , जुने हेवेदावे विसरून एक समानतेचा समाज घडवूयात , ज्यात कशाला हि आरक्षण नाही , प्रत्येकाला समान न्याय आणि अधिकार , फक्त कर्तुत्वाला आणि माणुसकीला किमंत हवी.
टिळकांनी , फुलेंनी , बाबासाहेबांनी , जे वैचारीक आणि समानतेच्या समाजाचे स्वप्न पहिले आहे ते तुम्ही आम्ही एकत्र येउन पूर्ण करू शकू.

प्रत्येकाचे ध्येय फक्त प्रगती , माणुसकी हेच असायला हवे, कोणत्याही बाबा बुवा च्या नादाला लागण्यापेक्षा , माणसात देव पाहूयात. प्रत्येकाला साथ देऊ कसलाही भेदभाव न ठेवता एकत्र येउन काम करू , समाजाला एक सक्षम आणि सुसंस्कृत अशी बाजू देऊ, मला मान्य आहे गेले कैक वर्षे ह्या सगळ्या ढिगार्याखाली आपला समाज दबला आहे , त्याला बाहेर काढणे कठीण आहे पण अशक्य नाही, आपण सगळे जण  एकत्र आलो ,आपल्यातली सगळी दरी मिटवली आणि फक्त माणूस म्हणून एकमेकांना साथ दिली ,हाथ दिला तर खरेच शिवरायांचे खऱ्या सुराज्याचे स्वप्न लवकरच साकारेल.

प्रत्येकाला फक्त स्वतःपासून सुरवात करायची आहे , आपल्या जवळ जे काही आहे जसे आहे त्यातून एका एकसंध उदिष्ठा साठी जे काही करता येईल ते करूयात , पर्यावरण वाचवणे असेल , नियम पाळणे असेल , परिसर स्वच्छ ठेवणे असेल, गरजवंताला मदत करणे असेल,जात पात न पाळता सर्वाना एक न्याय देत सालोख्याने राहणे असेल , समाजातील दिन दुबळ्या लोकांना त्यांच्या पायावर उभे करणे असेल, समाज शिक्षित आणि सुसंस्कृत करणे असेल , किंवा अजून बरेच काही प्रत्येकाच्या शक्ती नुसार इच्छे नुसार गरजे नुसार आपापल्या पद्धतीने ह्या समाजचे देणे फेडूयात.

माझ्या ह्या छोट्याश्या प्रयत्नाला आपली साथ मिळेल अशी आशा आहे , ह्या संकेत स्थळावर आपण आपल्या कल्पना , अडचणी , उपदेश , मार्गदर्शन , असे सगळे काही नोंदवू शकता , एकमेकांना मदत करू आणि ह्या समाजाचे चित्र बदलण्याचा एक पर्यंत करू,

शुभं भवतु

अद्वैत








 

Friday, March 18, 2016

सुसंस्कृत का प्रगत

आपण सगळे नेहमी म्हणतो भारत हे एक प्रगतीशील किंवा विकसनशील राष्ट्र आहे बाकी काही इतर देशांसारखे प्रगत राष्ट्र नाही.
ह्यावरूनच एक विचार मनात आला ,प्रगत म्हणजे नेमके काय आणि कशाला प्रगत म्हणायचे ?
ज्या राष्ट्रा मध्ये खूप पैसा आहे आजूबाजूला लक्ख रोषणाई आहे अश्या राष्ट्राला प्रगत म्हणायचे का जिथे संस्कार, संस्कृती आणि प्रगल्भ विचार आहेत अश्या राष्ट्राला प्रगत म्हणायचे ?
आम्ही विचारांनी प्रगत आहोत का ? प्रगतीच्या नावाखाली आम्ही चंगळवाद कडे चाललो आहोत का ? हे प्रश्न सर्वसामान्यांना पडतच नाहीत का ?
ज्याला आपण प्रगती म्हणतो आहोत ती खरीतर अधोगती आहे असे आम्हाला जाणवतच नाही.
ज्या मुलभुत तत्वांवर आपली प्रगती उभी राहायला हवी ती तत्वे च कुठेतरी लोप पावत चालली आहेत मानसिकता आणि विचाराधीनता च कुठेतरी रसातळाला जात आहे.
मद्यपान न करणे ,अंगप्रदर्शन न करणे,खोटे वा अप्रामाणिक न वागणे,थोरामोठ्यांचा आदर  करणे,नात्यांमध्ये मानसिक आधार असावा  असे किती आणि कोणती तत्व आम्ही दुर्लक्षित करतो आहोत , काही बुद्धीजीवी ह्यावर ही चर्चासत्र आयोजित करून वादविवाद करतात खरेच ह्यात हि वाद होऊ शकतो ज्या गोष्टी तुमच्या अंगभूत हव्यात जीवनाचा एक भाग हव्यात त्यात हि कशी अडचण वाटू शकते.
जसे दोन वेळेला जेवण लागते आणि त्यासाठी कसलाही वाद नसतो आपण कोणाला विचारात नाही का रे बाबा हे बरोबर का चूक तसेच हि तत्वे आहेत त्यात का विचारावे लागते का प्रश्न पडतो.
हे गुण एखाद्या व्यक्तीच्या अंगी असतील तर त्याचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि आपोआपच समाज सुसंक्तृत होईल
आजकाल एक स्वातंत्र्य नावाचा नवीन विषय उदयास आला आहे ,आपण भारतमाते साठी मिळवले ते स्वातंत्र्य नव्हे तर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि गम्मत म्हणजे त्याची व्याख्या हि त्याच व्यक्ती ने ठरवलेली असते ज्या करवी सगळे काही खपून जाते मग त्या मद्यधुंद पार्ट्या असो किंवा अर्धनग्न अवस्थेमध्ये विचित्र अंगविक्षेप करत नाचणे असो.
ह्या अश्या गोष्टींवर वेसण घालणार तरी कोण आणि कसे ? ज्या लोकांना आपण स्वतःच  संपत चाललो आहोत हे कळत नाही त्यांना समाज संपतो आहे हे कधी जाणवणार.
ह्या चुकीच्या प्रगतीच्या नादात आपण माणूसपण सोडत आहोत का ? स्वातंत्र्य वाईट प्रवृत्ती पासून, विकृत विचारांपासून, जुन्या चुकीच्या रूढी परंपरांपासून, हवे असे का नाही ठरवत आणि योग्य मार्ग अवलंबत.
ज्या लोकांना ह्या अश्या वागण्याचा तिरस्कार येत नाही पण प्रश्न मात्र पडतात आम्ही आमच्या पद्धतीने का नाही जगायचे आणि त्यात वाईट ते काय त्यांना असे प्रश्न नाही पडत का, कि खरच मी योग्य मार्गाने आणि प्रवृतीने वागलो तर त्यात वाईट ते काय ?
अंगभर कपडे घालणे व्यसनाधीन न होणे सर्वाना सांभाळून समाजाचा तोल सावरणे माणसामध्ये देव बघणे ह्यात वाईट काय आहे ,हरकत काय आहे करायला?
सात्विक न राहण्या मागे कारण काय ह्याचे उत्तर सहसा नसते ह्या बुद्धीजीवी कडे नुकसान नक्कीच नाही ना काही असे वागलो तर.
आपण स्वतःला पुरोगामी विचारांचे पुढारलेले म्हणवतो पण ह्याच अश्या समाजामध्ये आजही आंतरजातीय विवाह वेगळ्या निकषांमध्ये मोजला जातो,विधवा विवाह आजही १००% स्वीकारला जात नाही,बलात्कार झाल्यावर त्या बिचार्या अबला स्त्री ला समाजात मानाचे  स्थान मिळत नाही लोकांच्या नजरा बदलतात,कोड असलेला स्त्री पुरुष आजही त्याचे नसलेले आजारपण लपवत समाजात वावरतो,मतीमंद किंवा अश्याच मानसिक रुग्णांना आमच्या कडे दया मिळते पण बरोबरीचे स्थान मिळत नाही,विकृत  प्रवृत्तीच्या नराधमाना आमच्याकडे शिक्षा नाही , असे बरेच काही ..
का नाही आम्ही ह्यातून स्वातंत्र्य मागून विचारा मध्ये मानसिकते मध्ये प्रगत होऊन समाजाची प्रगती करत.
नग्नता किंवा व्यभिचार हि प्रगती नव्हे , प्रचंड पैसा  अडका कमावला पण जन्मदात्या आई वडिलांना विसरला लहान लोकांशी कसे वागावे ह्याची चाड लक्षात नाही राहिली तर हि प्रगती काय कामाची.
माणसांबद्दल माणुसकी नसेल करुणा ,प्रेम नसेल तर त्या व्यक्तीच्या प्रगतीला कसलाही अर्थ उरत नाही.
सांगायला बोलायला बरेच आहे पण इतकेच सांगेन कि विचाराने प्रगत व्हा कोणत्याही चुकीच्या गोष्टींचे अंध अनुकरण करून आपल्या संपन्न संस्कृतीकडे पाठ फिरवू नका.
लिंग ,जात,धर्म ह्यात कसलाही भेद न करता झेंड्याचे राजकारण न करता ,ह्या पलीकडे जाऊन फक्त माणुसकीचा विचार करून एक सक्षम आणि सुसंकृत समाज बनवूया.
माणसातली माणुसकी ओळखून त्यातच देव मानला ,दुसर्याचे मन समजुन अडचणी मध्ये आधाराचा हात दिला ,तर सहज सोपे आनंदी आयुष्य जगणे फार काही अवघड नाही.
चला तर मग एक सुसंस्कृत आणि प्रगत समाज बनवूयात आणि त्याची सुरवात स्वतः पासून करूयात.

शुभम भवतु

अद्वैत