Sunday, September 25, 2016

समाजाची मोर्चेबांधणी

सध्या सगळ्यात जास्त चर्चेचा विषय असलेला मराठा समाजाचा मूक मोर्चा , इतक्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय सामील होऊनही शांततेचा भंग न करता सुनियोजित पद्धतीने पार पडलेल्या ह्या मोर्चाचे कौतुक नक्कीच करावे. परंतु ज्या कारणांसाठी हा सगळा उहापोह केला ते मुद्दे मात्र फारच चुकीचे किंवा अर्थहीन वाटतात. आरक्षण,छुवाछूत कायदा,कोपर्डी प्रकरण असे काही मुद्दे ह्यात होते. 
आता आरक्षणा विषयी आपण कित्येकदा वेगवेगळ्या समाजाच्या समस्या अधोरेखित करताना बोलतच असतो.
माझे व्ययक्तिक मत कोणत्याही समाजाला आरक्षण नको हेच आहे आणि ते ठाम आहे.. आता ह्यात हि आरक्षण असावे तर ते केवळ आर्थिक पातळीवर मग ते कोणत्याही जाती धर्माचे असावे. कारण गरीब लोक हे सर्व जाती धर्मात आहेत केवळ मराठा, गुजर, पटेल अश्या काही समाजात नाही.. ब्राम्हण समाजात ही आहेतच कि गरजू कनवाळू लोक. प्रत्येक समाजाने कष्ट करावे आणि आपले कर्तृत्व सिद्ध करावे जिथे आर्थिक अडचण येते तिथेच आरक्षण द्यावे. आता मराठा शेतकरी आत्महत्या करतो हे वाक्यच किती बालिश आहे. शेतकरी आत्महत्या करतो असे का नाही , का केवळ शेतकरी मराठा असला तरच तो आत्महत्या करणार आणि बाकी जाती धर्मात सगळे सुकाळ आहे तर तसे नाही ज्या राजकारण्यांना आज समाजाचा कळवळा आला त्यांनी गेले २५-३० वर्षे त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी असे कितीसे पर्यंत केले आणि त्यात किती आत्महत्या थांबवल्या तेव्हा तर त्यांचे लक्ष धरणात स्वतःच्या मूत्राचा साठा करून पाणी वाढवणे हा होता असो तो मुद्दा नको.
कोपर्डी प्रकारण म्हणावे तर तो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे कोणा एका समाजाचा नाही. उद्या उठून हि घटना कोणत्याही जाती धर्मात घडली तरी त्याला योग्य ती शिक्षा हवीच. आणि त्यासाठी असलेले काही कायदे किंवा नवीन करावे लागणारे कायदे हे योग्य रितेने वापरावे आणि शासनाने तसे करावे.
आणि छुवाछूत कायदा , हा तसा कालबाह्य आहे आणि आजही समाजा समाजातल्या कोणत्याही जाती धर्मातल्या कोणत्याही लोकांवर असा अन्याय होत असेल तर तो अक्षरशः चुकीचा आहे आणि त्याला योग्य ते शासन हे हवेच
मुळात हे सगळे मुद्दे कोणा एका जाती धर्माचे होऊच नाही शकत, आता काही पुढारी आणि राजकारणी त्याला आपल्या स्वार्था साठी वापरून घेऊन लोकांची दिशाभूल करतात हे अत्यंत्य दयनीय आहे. पण आपण कितपत आंधळे पणाने ह्याचे अनुकरण करायचे हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे.
सर्वात महत्वाचे, ज्या माता जिजाऊ च्या नावाने हा सगळं उहापोह करतात त्या मातेने शिवबाला कधीही स्वराज्याची भीक मुघलांकडे माग अशी शिकवण दिली नाही. कोणत्याही जाती धर्माचे राजकारण कर आणि स्वतःचा समाज सक्षम कर असे कधीही जिजाऊ नि शिकवले नाही आणि शिवरायांनी कधीही तसे केले नाही . शिवरायांच्या स्वराज्या मध्ये सर्व जात धर्म एकसमान होते. ज्या शिवरायांचे आपण अनुकरण करू इच्छितो ते कर्तृत्ववान होते.स्वबळावर कष्ट करून तत्वनिष्ठ राजकारण करून हे स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या नखांची हि सर आजकालच्या कोणत्याही राजकारण्याला नाही आणि त्यांचे अंध अनुकरण करणाऱ्या ह्या निर्दिस्त समाजाला हि नाही
हे असे शक्तिप्रदर्शन करून मराठा समाजाने आपली एकजूट आणि शक्ती दाखवली आता तीच शक्ती आणि क्षमता ह्या पूर्ण समाजाच्या भल्या साठी आणि माणुसकी साठी वापरली तर ह्या स्वराज्यात कोणालाही कशासाठी ही आरक्षण घ्यावे लागणार नाही.
जात आणि धर्म हा एकच आणि तो म्हणजे माणुसकी ,जसा महारांजाचा होता , गरजू लोक मग ते कोणत्याही समाजाचे आणि जातीचे असो सामान आहेत आणि त्यांची मदत आणि त्यांना आधार हाच खरा सुराज्याचा गुरुमंत्र.. आपल्या पुढल्या पिढिला योग्य ते संदेश देऊयात. हे असे जातीयवादाचे बीज आता नको पसरुयात, ह्याने समाजचे नुकसानच होते असा आपला इतिहास आपल्याला साक्ष आहे. हे असे प्रत्येक समाजाने उठून आम्हाला हे हवे ते हवे असे केले तर समाज समक्ष नाही तर विघटित होईल आणि नेहमीप्रमाणे बाह्य शक्ती आणि राजकारणी त्याचा गैरवापर करतील
सर्वांनी मिळून एकत्र येऊन समाजाला सक्षम करूयात सर्व रंजले गांजलेल्याना गरजू लोकांना मदत करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करूयात सर्व जण एकत्र चालूयात जातीधर्म असे काही नको. आणि हीच शिकावण आपण आपल्या पुढल्या पिढीला देऊ जेणेकरून येणारा समाज हा खूप प्रगतिशील माणूसकीने वागणारा आणि खऱ्या अर्थाने सुसंस्कृत असेल. आणि ह्याच अश्याच सुराज्याचे आणि स्वराज्याचे स्वप्न महाराजांनी पहिले आहे ते आपण सर्व एकत्र आलो तरच पूर्ण होईल.

शुभम भवतु
अद्वैत




 

1 comment: